डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त, प्रभावी भाषण, प्रेरणादायी चारोळ्या व आकर्षक प्रश्नमंजुषा
डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना जयंतीनिमित्त विनम्र अभिवादन
डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना जयंतीनिमित्त आम्ही आपणासाठी घेऊन आलो आहोत -
👉महत्वपूर्ण भाषण
👉प्रेरणादायी चारोळ्या
👉आकर्षक प्रश्नमंजुषा
भाषण 1 -
आदरणीय व्यासपीठ, वंदनीय गुरुजनवर्ग आणि माझ्या बालमित्रांनो,
"दगडालाही पाझर फुटला, असा तो भीमाचा विचार होता,
गुलामीच्या साखळदंडांना तोडणारा, तो धगधगता अंगार होता!"
आज १४ एप्रिल, भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार, भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची १३५ वी जयंती. आजचा दिवस म्हणजे केवळ एका महापुरुषाचा जन्मदिवस नाही, तर तो आहे अज्ञानाच्या अंधारातून ज्ञानाच्या प्रकाशाकडे नेणारा उत्सवाचा दिवस!
डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे पूर्ण नाव भीमराव रामजी आंबेडकर. त्यांचा जन्म मध्य प्रदेशातील महू येथे झाला. त्यांचे बालपण खूप संघर्षात गेले, पण त्यांनी संकटांना घाबरून न जाता शिक्षणाला आपले शस्त्र बनवले. त्यांनी एकाच वेळी अनेक विषयांत पदव्या मिळवल्या. त्यांचे वाचन इतके दांडगे होते की, ते जगातील सर्वात विद्वान व्यक्तींपैकी एक मानले जातात.
बाबासाहेबांनी आपल्याला तीन महत्त्वाचे संदेश दिले:
१. शिका: शिक्षण हे वाघिणीचे दूध आहे आणि जो तो प्राशन करेल तो गुरगुरल्याशिवाय राहणार नाही.
२. संघटित व्हा: एकीचे बळ सर्वात मोठे असते, त्यामुळे समाजात एकजूट ठेवा.
३. संघर्ष करा: अन्यायाविरुद्ध आवाज उठवल्याशिवाय न्याय मिळत नाही.
बाबासाहेबांनी केवळ दलितांसाठीच काम केले नाही, तर भारतीय संविधानाच्या माध्यमातून त्यांनी महिलांना मतदानाचा अधिकार दिला, मजुरांच्या कामाचे तास निश्चित केले आणि सर्वांना समानतेचा हक्क मिळवून दिला. आज आपण जे स्वतंत्र आणि सन्मानाचे जीवन जगत आहोत, त्यामागे बाबासाहेबांचे अपार कष्ट आहेत.
मित्रांनो, आज त्यांच्या जयंतीनिमित्त आपण केवळ त्यांचे फोटो पूजण्यापेक्षा त्यांचे विचार अमलात आणूया. आपणही खूप शिकावे, मोठे व्हावे आणि समाजाची सेवा करावी, हीच त्यांना खरी श्रद्धांजली ठरेल.
शेवटी मी इतकेच म्हणेन की,
"नभातील सूर्याला कोणाचे भय नसते,
अन सागराच्या लाटांना कोणाचे दडपण नसते,
जो भीमाच्या विचाराने चालतो, त्याला कशाचेच मरण नसते!"
जय भीम! जय भारत!
भाषण 2 -
आज १४ एप्रिल. भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार, दीन-दलितांचे कैवारी आणि ज्ञानाचे महासागर डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती.
बाबासाहेबांचे जीवन म्हणजे एक धगधगता संघर्ष होता. "शिका, संघटित व्हा आणि संघर्ष करा" हा महामंत्र त्यांनी आपल्याला दिला. त्यांनी केवळ दलितांसाठीच नाही, तर स्त्रिया, मजूर आणि एकूणच मानवतेच्या कल्याणासाठी आपले आयुष्य वेचले.
आज आपण तंत्रज्ञानाच्या युगात आहोत, पण बाबासाहेबांनी दिलेला विचारांचा वारसा आजही तितकाच ताजा आहे. त्यांनी आपल्याला समता, स्वातंत्र्य आणि बंधुता शिकवली. त्यांच्यामुळेच आज प्रत्येक भारतीयाला सन्मानाने जगण्याचा अधिकार मिळाला आहे.
शेवटी इतकेच म्हणेन, "कोटी कोटी मुखांनी त्यांचे गुणगान गावे, अशा या महामानवास कोटी कोटी प्रणाम!"
जय भीम!
प्रेरणादायी चारोळ्या -
१. नभातून सूर्य खाली उतरला,
असा तो तेजाचा गोळा होता...
अन्यायाविरुद्ध लढणारा माझा,
भीमराव वाघ निराळा होता!
२. निळ्या रक्ताची धमक ज्यांच्या रक्तात आहे,
भीमाची भक्ती ज्यांच्या हृदयात आहे...
गुलामगिरीच्या साखळदंडातून मुक्त केले आम्हाला,
अशा महामानवाची शक्ती या जगात आहे!
३. लेखणीने ज्यांच्या इतिहास घडला,
काळोखात त्या तेजाचा किरण पडला...
कोटी कोटी जनतेचा तो उद्धारकर्ता,
माझा भीमराव जगाचा भाग्यविधाता ठरला!
बाबासाहेबांच्या जयंती दिनाचे औचित्य साधून आम्ही आपणासाठी घेऊन आलोत डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्यावर खास
'विशेष सामान्य ज्ञान प्रश्नमंजुषा..'
ज्यामुळे आपल्याला डॉ.आंबेडकर जयंती साजरा केल्याचा आनंद तर मिळणारच शिवाय आपणास डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्याविषयी अधिक माहिती होईल. यामध्ये बाबासाहेबांवर आधारित सर्वसमावेशक असे प्रश्न समाविष्ट केलेले आहेत. त्यामुळे आपल्या ज्ञानात निश्चितच भर पडेल. जरी एखाद्या प्रश्नाचे उत्तर आपणास माहिती नसेल तरी त्याची माहिती होईल.
चला तर ही प्रश्नमंजुषा सोडवून आपण बाबसाहेबांविषयीचे आपले ज्ञान तपासूयात ..
